श्रीमद्भगवद्गीता अध्याय १ अर्जुनविषाद योग
स्वामी रामसुखदास टीका सारांश-दिवस १
१ ) संसारात प्रामुख्याने भूमी , धन , स्त्री या ३ गोष्टीसाठीच लढाया होतात !
२ ) कोणतेही कर्म धर्माला अनुसरुनच करावे !
३ ) जे भाव अंतकरणात असतात तेच वाणीतून प्रकट होतात !
४ ) द्वैत भावनेनेंच आपसात प्रेम - स्नेह राहत नाही !
५ ) ज्याच्याशी आपली विशेष प्रीती नाही त्याच्याकडून आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी मनुष्य त्याला जास्त आदर देऊन खुश करतो !
६ ) अधर्मी - अन्यायी - पापी व्यक्ती कधीही निर्भय आणि सुख शांतीयुक्त राहू शकत नाही !
७ ) ज्यांच्या ठिकाणी नाशवंत धन - संपत्तीचा आश्रय आहे व ज्यांच्या हृदयात अधर्म -अन्याय - दुर्भावना आहे ते बलहीन असतात व अंतःकरणातून घाबरलेले असतात !
८ ) भौतिक सुखांना महत्व देऊन आणि संयोगजन्य सुखाच्या प्रलोभनात फसून कधीही अधर्माचा आश्रय घेऊ नये !
९ ) आपणाकडून आपल्या शरीर - मन - वाणी याद्वारे कधीही अन्याय व अधर्म होऊ देऊ नये कारण याने आपले हृदय बलहीन होते !
१ ० ) मनुष्य कोठेही असो कोणत्याही परिस्थितीमध्ये असो त्याच प्राप्त स्थितीमध्ये राहून तो निष्काम होवून परमात्मा प्राप्ती करू शकतो !
१ १ ) काम - क्रोध - लोभ हे ३ नरकाचे द्वार आहेत ! वास्तविक हि ३ एका काम याचीच रूपे आहे ! कामनेची २ प्रकारे क्रिया होते १ = इष्ट प्राप्ती २ = अनिष्ट निवृत्ती ! इष्टाच्या प्राप्तीचे २ प्रकार आहे १ ) संग्रह २ ) सुख भोगणे
१ २ ) संग्रहाच्या इच्छेला लोभ म्हणतात व सुखभोगाच्या इच्छेला काम म्हणतात !
१ ३ ) अनिष्टाच्या निवृत्तीत अडचण आली तर क्रोध निर्माण होतो
१ ४ ) आततायी ६ प्रकारचे असतात ! १ = आग लावणारा २ = विष देणारा ३ = शस्त्र घेऊन हल्ला करणारा ४ =संपत्ती हरण करणारा ५ = स्त्री हरण करणारा ६ = खून करणारा ! ह्यांच्या हत्येला अधर्म नाही समजले जात !
१ ५ ) ज्या ठिकाणी लढाई होते तिथे समय - शक्ती - संपत्ती यांचा नाश होतो !
१ ६ ) वस्तूंचा संयोग होऊन वियोग होणे जास्त सुखदायी असते !
१ ७ ) ज्या वस्तूंचा आत्ता अभाव आहे त्यांची प्रारब्धानुसार प्राप्ती जरी झाली तरी शेवटी त्याचा अभावच राहणार आहे !
१ ८ ) लोभामुळे वस्तू प्राप्ती साठी अथक परिश्रम व दुःख भोगावे लागतात , वस्तू प्राप्ती संयोगाने थोडे सुख भेटते परंतु पुन्हा अभाव झाल्याने दुःख प्राप्त झाले ! हे सगळे लोभामुळे झाले !
१ ९ ) अंतःकरणात लोभ नसेल तर वस्तू संयोगाने सुख होणारच नाही ! मोहरूपी दोष नसेल कुटूंबियापासून सुख होऊच शकत नाही ! संसाराचे सुख दोषाशिवाय शक्य नाही !
२ ० ) इतरांच्या दोषदृष्टीमुळे आपला अभिमान तीव्र होतो व स्वतःचे दोष दिसेनासे होतात !
२ १ ) मनुष्य ज्या स्थिती व श्रेणीमध्ये असतो त्याला तो ठीकच समजत असतो ! त्याहून उच्च श्रेणीला तो समजू शकत नाही !
0 Comments